महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

केडीएमसी मुख्यालयावर ठेकेदार संघटनेचे आंदोलन; तीन वर्षांपासून २०० कोटींची देणी थकीत असल्याचा आरोप

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर आज ठेकेदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेची विविध विकासकामे पूर्ण करूनही ठेकेदारांना त्यांच्या कामाची देणी मिळालेली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
महापालिकेची कामे पूर्ण केल्यानंतरही बिले अदा न झाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठेकेदारांकडे काम करणारे कामगार तसेच साहित्य पुरवठा करणारे सप्लायर पैशांसाठी सतत तगादा लावत आहेत. त्यामुळे ठेकेदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, अनेकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
“आम्ही सरकारची आणि महापालिकेची कामे केली आहेत. आमच्या मेहनतीचे पैसे सरकारने आम्हाला द्यावेत,” अशी मागणी ठेकेदारांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून देणी रखडल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली असून, शासनाने आणि महापालिका प्रशासनाने तातडीने थकीत बिले अदा करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
ठेकेदार संघटनेच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० ते १५० ठेकेदारांची तब्बल २०० कोटी रुपयांची देणी सरकारकडे/महापालिकेकडे थकीत आहेत. या थकीत रकमेमुळे ठेकेदारांना कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठादारांची देणी तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण झाले आहे.
यावेळी आंदोलकांनी असा गंभीर आरोपही केला की, आर्थिक देणी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे काही ठेकेदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून ठेकेदारांची थकीत देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, थकीत बिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ठेकेदार संघटनेने दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »