DESK MARATHI NEWS NEYWORK.
कल्याण/प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा तहकूब करण्यात आल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महासभा तहकूब करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मनसेनेही भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
मनसेला सत्तेबाहेर काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. यावर मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत, “भाजप अचलपूरमध्ये एमआयएमसोबत बसते, ते चालते का? असा सवाल उपस्थित केला.
तसेच, Gen-Z आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अनेक अपशब्द वापरण्यात आले, त्यावेळी भाजपने महासभा तहकूब करण्याची मागणी का केली नाही? असा प्रश्नही लांडगे यांनी उपस्थित केला.
महासभा तहकुबीच्या निर्णयावरून महायुतीतील घटक पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने आगामी काळात कल्याण-डोंबिवलीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे



