महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जन चळवळ

DESK MARATHI NEWS NETWORK

कल्याण/प्रतिनिधी -संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या माध्यमातून हरित, संतुलित आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्यरत आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ३५० वृक्ष समूह स्थापित करण्यात आले आहेत. तसेच ६०० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादलाचे स्वयंसेवक पूर्ण समर्पणाने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुढे नेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवार, २३ ऑगस्ट रोजी या महाअभियानाच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६३० ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने मिशनचे लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवक समर्पित भावनेने सहभागी होत सुमारे १० लाख रोपांची लागवड करणार आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन केवळ रोपे लावण्यापुरती आपली जबाबदारी मर्यादित ठेवत नाही, तर ती रोपे वृक्ष होईपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्पही पूर्ण करते. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल केली जाणार आहे, जेणेकरून त्यांची योग्य वाढ होऊन ते घनदाट लघुवनांचे स्वरूप धारण करतील, जैवविविधता समृद्ध करतील.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »