महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप सुरु असून कल्याण-डोंबिवलीमधील आशा कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या विविध मागण्यांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयावर धडक देत, आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

कोरोना काळात आशा कर्मचाऱ्यांचे काम महत्त्वाचे असून, त्यांना याबदल्यात मोबदला मात्र मिळत नाही. तसेच आरोग्यविषयक सुरक्षा देखील त्यांना मिळत नाही. शासनाने ठरवून दिलेले किमान वेतन देखील मिळत नसल्याने आपल्या हक्काच्या वेतनासाठी या आशा कर्मचाऱ्यांनी केडीएमसी मुख्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली. कल्याण डोंबिवली परिसरात सुमारे १७५ आशा कर्मचारी काम करत आहेत.

आशा व गटप्रवर्तकांना सरकारी सेवेत कायम करा. सर्व आशांना योग्य नेमणूकपत्रे, आशा डायरी, किट्स मिळाल्या पाहिजेत. कोरोनाचे काम करताना त्यांना पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायजर, केसशिल्ड, हँडग्लोव्हज आदी सुरक्षा साधने पुरवण्यात यावी. अॅटिजन टेस्ट साठी प्रतिदिन ५०० रुपये मोबदला मिळावा. कामावर असताना बरेचदा त्यांच्यावर शाब्दिक, शारीरिक हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी. आशा व गटप्रवर्तकांना कोरोनासाठी स्थानिक आस्थापनांनी दरमहा किमान एक हजार रुपये द्यावे.

कोरोनामुळे मृत पावलेल्या आशांना ५० लाखाचे विमा कवच मिळवून द्यावे. आशा, गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबियांना बेड आणि इतर आरोग्यसेवांचा त्वरित आणि मोफत लाभ द्यावा. त्यांना गावोगावी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात इयुटी लावू नये. विनामोबदला कोणतेही काम त्यांच्यावर लादू नये आदी मागण्या यावेळी या महिलांनी केल्या. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »