महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image मुंबई

राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न

प्रतिनिधी.

मुंबई – राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४ ते २८ जानेवारी पर्यंत मराठी भाषा संवर्धन सप्ताह साजरा सजरा करण्यात आला. समारोप दिनी उपस्थित सर्व वक्त्यांनी मराठी भाषेचे सवर्धन होणे काळाची गरज असल्याचे म्हटले आहे.समारंभाच्या अध्यक्षस्थानी खजिनदार निवृत्ती दसाई होते.कार्यक्रमात वाचकही सहभागी झाले होते.
राष्टीय मिल मजदूर संघचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन गेल्या पंचवीस वर्षांत ग्रथालय आणि वाचनालयाचे अत्याधुनिकरण केले.इ-लायब्ररीकरण करण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न चालू आहेत,असे सांगून खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले,मराठी भाषा सातासमुद्रापलीकडे गेली आहे.संत काळापासून मराठी भाषा प्रगती पथावर असून तिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.
उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सांगितले, ब्रिटिशांचा अंमल असल्या पासून मराठी भाषेची वाटचाल सुरू असून मराठी बोली भाषा मैलागणिक बदलत गेली असली तरी मराठी साहित्यात तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कथा लेखक काशिनाथ माटल म्हणाले, मराठी भाषेने मराठी माणसाला घडविला.मराठी लेखकांनी ही भाषा समृध्द केली आणि अटकेपार नेली.परंतु आता तिला नव्यापिढीमध्ये तिच्या विषयी आवड निर्माण करावयास हवी !सहाय्यक सचिव मोहन पोळ, वाचनालयाच्या प्रभारी ममता घाडी,प्रियंका परब,आशा आसबे श्रावणी पवार यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.मधू घाडी,दीपक वाळवे, सुहास हरमळकर यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले.

Related Posts
Translate »