DESK MARATHI NEWS.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार ३५ वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला रुग्णांच्या नातेवाईक यांना अँब्युलन्स मिळण्यासाठी पाच तास लागले त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी पेक्षा लाजिरवाणी घटना घडली होती. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचे नाहक बळी जाण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत.
मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने पाच तास रुग्णालयात वाट पाहावी लागली या दरम्यान सविता यांचा मृत्यू झाला. आम्हाला वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर हा प्रसंग टाळता आला असता सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे, या प्रसंगानंतर सर्व मध्यमांनी या संदर्भातील बातम्या प्रसारित केल्या होत्या त्यानंतर सर्वच स्तरातून कल्याणच्या आरोग्य बद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. त्याची दखल त्वरित घेत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयाचा अचानक दौरा त्यांनाही यावेळी रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीचे दर्शन झाले यावर त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली व कडक निर्देश दिले.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिनांक ०७ मे २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णालयातील रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांनी मिळणाऱ्या सेवा, औषधसाठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला.
दौऱ्यात आयुक्तांच्या निदर्शनास आले की, ओपीडीची ठरलेली वेळ सकाळी ९.०० असूनही ती वेळेत सुरु झालेली नव्हती. याबाबत त्यांनी कडक नाराजी व्यक्त करत खालील स्पष्ट निर्देश दिले:
आयुक्तांचे निर्देश:
1. ओपीडी वेळापत्रक आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रसिद्ध करावे.
2. सर्व डॉक्टरांनी विहीत वेळेच्या किमान ५ मिनिटे अगोदर ओपीडीमध्ये उपस्थित राहावे.
3. डॉक्टर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश.
इतर महत्त्वाचे निर्देश:
* सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीनुसार अदा करावे.
* फार्मासिस्ट अनुपस्थित होता; याबाबत चौकशी करून अहवाल सादर करावा.
* औषध साठ्यावर संगणक प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवावे, औषधे उपलब्ध नसल्यास जबाबदारी निश्चित करावी.
* फार्मासिस्ट अनुभवी नसल्याची बाब निदर्शनास; नागरिकांना योग्य सेवा मिळावी म्हणून अनुभवी कर्मचारी नियुक्त करावेत.
* डॉक्टर/कर्मचारी वेळेत उपस्थित राहण्यासाठी आदेश निर्गमित करावेत; साप्ताहिक अचानक तपासणी करून अहवाल सादर करावा.
* स्त्रीरोग तज्ञांची ओपीडी सेवा त्वरित सुरु करावी.
* प्रसूती सेवा सुरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
* सुविधा अधिक दर्जेदार व्हाव्यात, रुग्णांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे.
* रुग्णालय बाहेरील कचरा व बॅनर तत्काळ हटवावे.
* रुग्णवाहिका दुरुस्त करून देखभाल नियमित करावी. वाहनचालक सेवा टाळल्यास कारवाईचे प्रस्ताव सादर करावेत.
शिस्त, पारदर्शकता आणि दर्जेदार रुग्णसेवा हीच प्राथमिकता असली पाहिजे असे यावेळी महापालिका आयुक्तांनी रुग्णालय व्यवस्थापनाला बजावले आहे. आता येणाऱ्या काळात रुग्णालय प्रशासन आपला बेशिस्त पणा सोडून आपले कर्तव्य व्यवस्तीत पार अशी अशा आहे.