महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथे सात दुकाने जळून खाक

सोलापूर/अशोक कांबळे – शुक्रवारी रात्री मोहोळ शहरातील सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून सात दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.आग शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागली.यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मोहोळ शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांच्या जीव रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांचा अभाव मोहोळ नगर परिषदेकडे असून शहरात आगीने मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी नगर परिषद घेईल का ? शहरात आगीने जीवितहानी झाल्यानंतरच नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्या घेणार का असा सवाल नागरिक करीत आहेत.मोहोळ नगर परिषदेकडे अग्निशामक दलाच्या गाड्या असत्या तर शुक्रवारी संध्याकाळी लागलेली आग आटोक्यात आणून कमी प्रमाणात नुकसान झाले असते.नगर परिषदेकडे वारंवार मागणी करून ही अग्निशामक दलाच्या गाड्या घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.भविष्यात आगीने मोहोळ शहरात मोठी जिवीतहानी झाल्यास त्याला नगर परिषद जबाबदार असेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोहोळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील रविराज शॉपिंग सेंटर मध्ये असणाऱ्या दुकानांना 2 एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली.या आगीमध्ये सात दुकाने जळून भस्मसात झाली.दरम्यान लोकनेते साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी वेळेत दाखल होऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
मोहोळ शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून या रस्त्यावर अनेकदा चालत्या वाहनांनी पेट घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी मोहोळ शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर,कुरुल रस्त्यावर अचानक चालत्या कंटेनरने पेट घेतला होता.यामध्ये लोकनेते कारखाना व लोकमंगल कारखाना येथून अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यन्त कंटनेर जळून खाक झाला होता.सुदैवाने ही घटना शहरापासून काही अंतरावर घडल्याने यामध्ये जास्त प्रमाणात नुकसान झाले नाही.यावेळी काही तासासाठी या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
मोहोळ शहराची लोकसंख्या वाढल्याने ग्रामपंचयातीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे उलटली आहेत.काही महिन्यात नगर परिषद दुसऱ्या पंच वार्षिक निवडणुकीला सामोरे जाणार आहे.मोहोळ मधील जनता वीज,पाण्याच्या समस्येला सामोरे जात असताना मोहोळ शहरात वारंवार लागणाऱ्या आगी विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्या नगर परिषदेकडे नाहीत.त्यामुळे मोहोळ शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोहोळ शहरात आग लागल्यास अनगर येथील लोकनेते साखर कारखाना,लोकमंगल साखर कारखाना येथील अग्निशामक गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण केले जाते.मोहोळ शहरापासून लोकनेते कारखाना सुमारे आठ किलोमीटर आहे तर लोकमंगल कारखाना सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.मोहोळ शहरात लागलेली आग विझविण्यासाठी गाड्या येईपर्यंत आगीत मोठया प्रमाणावर नुकसान होते.मोहोळ शहरात अद्यापपर्यंत आगीने जीवितहानी झालेली नाही पण वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.शहरात आगीने जास्त जीवितहानी होण्याची नगर परिषद वाट पहात आहे का ? जास्त जीवितहानी झाल्यानंतरच नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्या घेणार का असा सवाल मोहोळ मधील नागरिक करीत आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »