महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

भिवंडीतील भुयारी गटर योजनेचा नियोजन शून्य कारभार; नळ कनेक्शन तोडल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण

भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी महापालिकेची भुयारी गटर योजना नेहमीच चर्चेत येत असून या गटर योजनेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. या भुयारी गटर योजनेच्या ठेकेदाराने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केल्याने शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली असून शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यातच आता शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात भुयारी गटर योजनेचे काम करतांना करण्यात आलेल्या खोदकामाने येथील सुमारे ५० ते ६० परिवारांचे नळ कनेक्शन ठेकेदाराने तोडले आहे. मागील पंधरा दिवसांपासून ठेकेदाराने हे तोडलेले नळ कनेक्शन पुन्हा जोडले नसल्याने येथील राहिवासींना ठेकेदाराच्या हलगर्जी कारभारामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मागील चार दिवसांपासून तर येथील राहिवासींना तोडलेल्या नळ कनेक्शनमुळे पिण्याच्या पाण्याला मुकावे लागले असल्याने येथील नागरिक मनपासह भुयारी गटर योजनेच्या ठेकेदारावर कमालीचे नाराज झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून तोडलेल्या या नळ कनेक्शनकडे मनपा प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष जात नसल्याने येथील महिला वर्गाकडून मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून येत्या दोन दिवसात येथील तोडलेले नळ कनेक्शन ठेकेदार अथवा मनपा प्रशासनाने जोडले नाही तर महापालिकेच्या मुख्यालयावर महिला व नागरिक हंडा मोर्चा काढतील असा इशारा येथील रहिवासी यांनी दिला आहे.                  

विशेष म्हणजे गटर योजनेचे काम करतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी व समस्या होणार नाहीत याची खबरदारी संबंधित ठेकेदाराने घेणे गरजेचे असल्याच्या लेखी सूचना मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी ठेकेदारांना वेळोवेळी देऊनही संबंधित ठेकेदार मनपा आयुक्तांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून शांतीनगर भाजी मार्केटपरिसरातील नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत असल्याने मनपा आयुक्त या ठेकेदारांवर कारवाई करणार का याकडे शांतीनगर परिसरातील नावरीकांसह संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

Related Posts
Translate »