महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

NRC,CAA निषेधार्थ २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद ची हाक: प्रकाश आंबेडकराची घोषणा

मुंबईः मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) तसेच देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने येत्या 24 जानेवारीला (शुक्रवारी) मुंबईबरोबरच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादरच्या आंबेडकर भवनात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीनंतर आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सीएए आणि एनआरसीविरोधात देशात प्रचंड रोष आहे. मोदी सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पहात आहे. जीएसटी, नोटबंदी आणि अविश्वानसाचे वातावरण यामुळे गुंतवणूक येईनाशी झाली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली असून देशाची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू आहे. या सर्व गोष्टींना मोदी सरकारच जबाबदार असून त्याचा निषेध नोंदवण्यासाठीच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. या बंदमध्ये महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या ज्या संघटनांनी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलने केली, त्या सर्वांनाच वंचित बहुजन आघाडीने आजच्या बैठकीला निमंत्रित केले होते. त्याला प्रतिसाद देत आजच्या बैठकीला 35 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सीएए- एनआरसीबरोबरच देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरही आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सर्वांचेच मत होते. त्यानुसार मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले
Related Posts
Translate »