महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स

बेपत्ता झालेल्या सीएचा मृतदेह टिटवाळा रेल्वे रुळाजवळ आढळला हत्या की आत्महत्या ? गूढ वाढले

कल्याण – मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत तपास सुरु असताना एका मोठ्या कंपनीच्या सीएचा मृतदेह संशयास्पद आढळून आला आहे .टिटवाळाजवळ रेल्वे रुळाजवळ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. सागर देशपांडे असे या सीएचे नाव असून ते ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. सागर यांनी आत्महत्या केली आहे, की त्यांच्यासोबत घातपात झाला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

 कल्याणजवळच्या टिटवाळ्यात १२ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळाच्या बाजूला आढळून आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी एडीआर दाखल करत पुढील तपास सुरु केला. सदर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्याचे फोटो राज्यभरात पाठविण्यात आले. अखेर आज त्या व्यक्तीची ओळख पटली. हा व्यक्ती ११ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. ठाण्यातील नवापाडा पोलीस ठाण्यात या व्यक्तीची मिसिंगची रिपोर्ट दाखल आहे. नातेवाईक सहा दिवसापासून त्याचा शोध घेत होते. सागर सुहास देशपांडे असे या व्यक्तीचे नाव आहे. सागर हे एका मोठ्या कंपनीत सीए होते. आणि ठाणे नौपाडा मधील चरई मधील राहणार असल्याचे समोर आले आहे  ते ट्रॅव्हल्स फर्म कंपनी  कामाला होते त्यांच्या कंपनी चा करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचे माहिती समोर येत आहे नक्की त्यांची हत्या झाली की आत्महत्या च्या तपास पोलिसांनी सुरू केला आहे .

Related Posts
Translate »