महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

बारवी प्रकल्पबाधितांना एमआयडीसीकडून नियुक्तीपत्र प्रदान

प्रतिनिधी.

मुंबई – बारवी धरणामुळे बाधित झालेल्या २०८ जणांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आजपासून सुरू केली असून पहिल्या टप्प्यात सहा जणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे.

महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री आतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, आमदार किसन कथोरे, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी उपस्थित होते.

बारवी धरणाच्या अतिरिक्त साठा पाणी वापर करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पाणी वापराप्रमाणे प्रकल्पबाधितांना सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमआयडीसी – ३२९, ठाणे महानगरपालिका – २३९, मिरा-भाईंदर – १७९, कल्याण डोंबिवली महानगरपालिका – १५५, नवी मुंबई महानगरपालिका – ६०, उल्हासनगर पालिका – ११९, अंबरनाथ नगरपरिषद – ७१ व म्हाडा – ५२ असे एकूण १२०४ प्रकल्पबाधितांना सेवेत घेतले जाणार आहे.

महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाने २४२ पात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे. त्यापैकी २०८ प्रकल्पबाधितांना नियुक्तीपत्र दिले जात आहेत. सहा जणांना नियुक्त पत्रे देण्यात आली. त्यांची नावे :-

१) ज्योत्सना लक्ष्मण पवार (कनिष्ठ अभियंता, स्थापत्य)

२) दिलीप जयवंत भोईर (तांत्रिक सहाय्यक)

३) शीतल दीपक भोईर (लिपिक टंकलेखक)

४) नरेश तानाजी भोईर (वाहनचालक)

५) रमेश धाको कडाली (मदतनीस)

६) कैलास गोपाळ भवर (शिपाई)

एमआयडीसीच्या बारवीधरण प्रकल्प योजनेत पहिल्या व दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एकूण १२ गावे बाधित झाली आहेत. पहिला टप्पा सन १९७२ व दुसरा टप्पा सन १९८६ मध्ये राबविण्यात आला. तथापि  पाणी साठा वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्यासाठी तिसरा टप्पा हाती घेण्यात आला. या टप्प्यात ६ गावे व ५ संलग्न पाडे विस्थापित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसनाचे काम एमआयडीसीमार्फत करण्यात आले.

Related Posts
Translate »