महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य, २४ तासांत तीन जबर जखमी

प्रतिनिधी.

डोंबिवली – दरवर्षी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमूळे टीकेचा भडिमार आणि नागरिकांकडून शिव्यांची लाखोली खाऊनही केडीएमसी काही सुधरण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. आधीच कल्याण डोंबिवलीत सर्वत्र कोरोनाची दहशत असताना नागरिक आता रस्त्यावर पडलेले खड्डे लोकांच्या जीवावर उठले आहेत. खड्ड्यांमूळे गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवली मध्ये ३ जण जबर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे केडीएमसी दरवर्षी चर्चेतही असते. आणि लोकांच्या प्रचंड रोषाची, संतापाची धनीही होते. दरवर्षी पावसाळ्यानंतर खड्डे आणि त्यामूळे होणाऱ्या अपघाताच्या घटना घडतात. 3 वर्षांपूर्वी तर कल्याण डोंबिवलीमध्ये खड्डयांनी ५ जणांचा जीव घेतला. एवढं सगळं होऊनही केडीएमसीतील सत्ताधारी आणि प्रशासन काही सुधरण्याचे नाव घेत नाहीत. खड्डे भरण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींची कंत्राटं काढली जातात. ज्यातून खड्डे भरण्यापेक्षा संबंधितांचे खिसेच भरले जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्याचे उत्तर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून आपसूकच मिळून जाते. यावर्षीही अशीच कोट्यवधींची कंत्राटं निघालीत पण रस्त्यावरचे खड्डे काही भरले गेलेले नाहीत. परिणामी दिवसभरात कल्यान डोंबिवलीत झालेल्या 3 वेगवेगळ्या अपघातात 3 जण जबर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आणखी किती जण जखमी झाल्यावर, आणखी किती जणांचे आणि कोणाचे बळी गेल्यानंतर हा सर्व खेळ थांबेल? आधीच कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक, कौटुंबिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत केडीएमसीचा हा निष्काळजीपणा म्हणजे लोकांना आगीतून फुफाट्यात ढकलण्याच्या प्रकरा सारखा आहे.

Related Posts
Translate »