महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

देसाई-आगासन खाडी उड्डाणपुलासंदर्भात मनसे आमदार, अधिकारी व ग्रामस्थांमध्ये संयुक्त बैठक

प्रतिनिधी.

कल्याण ग्रामीण – कल्याण ग्रामीण भागातील ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या शालू हॉटेल जवळून देसाई- आगासन  उड्डाणपुल मंजूर झाला. मात्र जुना आराखडा नामंजूर करत महापालिकेने नव्या आराखड्यानुसार उड्डाणपूलाचे काम करणार आहे. त्यामुळे या उड्डाणपूलाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केल असून जुन्या आराखड्यानुसार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

खाडीवरून जाणार देसाई-आगासन उड्डाणपुलाच्या कामात भूमीपुत्रांची घरे,जमीन आणि वृक्षांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हीच बाब ग्रामस्थांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या निर्दशनास आणून दिली.त्यानंतर लगेच त्यामुळे मनसे आमदार पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची आगासन गावात संयुक्त बैठक घेतली.

कल्याण ग्रामीण भागात असलेल्या आगासन ग्रामस्थांनी देसाई – आगासन खाडी उड्डाणपुलाच्या कामाच्या आराखड्याला विरोध केला आहे. या उड्डाणपुलाच्या कामामध्ये सुमारे ५० पेक्षा अधिक घरं आणि २०० पेक्षा अधिक वृक्षांची तोड होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या उड्डाणपुलाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केला असून जुन्या आरखाड्यानुसार काम करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी सुचवलेल्या मार्गिके संदर्भात मनसे आमदार राजू पाटील हे देखील सकारात्मक असून असून लवकरच या संदर्भात ठाणे मनपा आयक्तांची भेट घेतली जाणार आहे. आगासन गावातील गणेश घाटावर ग्रामस्थ,ठाणे मनपाचे अधिकारी आणि आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी ठाणे मनपा साहाय्यक आयुक्त महेश आहेर , उप अभियंता अनिल पाटील , आगासन गाव बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, दिवा मनसे शहराध्यक्ष तुषार पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts
Translate »