महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

व्यापाऱ्याला उसनवारी माल देणे शेतकऱ्याला पडले माहागात,व्यापाऱ्यावर लाखों रुपयांची थकबाकी

बुलढाणा/प्रतिनिधी – शेतकरी रक्ताचे पाणी करून शेतात घाम गाळतो. पिकांचे नुकसान झाले तरी भविष्यात आपल्या पिकाला चांगला भाव येईल या एका आशेवर ते काळ्या आईची सेवा करतात. पण नेहमी या गरीब शेतकऱ्याची नशीब थट्टा करते. पिकाला चांगला भाव मिळावा म्हणून अनेक शेतकरी आपल्या मालाची विक्री व्यापाऱ्याला करतात. पण अनेकदा हे व्यापारी शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे त्यांना देत नाहीत. असाच प्रकार बुलढाण्यात घडला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. जिल्ह्यातील देऊळघाट येथील व्यापाऱ्याने उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांकडून सोयाबीन व तूरसह अन्य शेतमालाची खरेदी केली होती. पण आज 3 ते 4 वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांकडून अनेकदा या व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर त्याने पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी थेट देऊळघाट गाठून व्यापाऱ्याला धारेवर धरले. मात्र तरीही व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये अजूनही दिले नाही. व्यापाऱ्यांचे नाव अ.लतीफ, अ.अजीज, कोहिनुर ट्रेडर्स असे आहे. व्यापाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश प्रभारी जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपले शेतमाल इतरत्र न विकता आपली फसवणूक टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोंगे यांनी केले आहे.

 

Related Posts
Translate »