महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

जनमित्रांच्या अथक परिश्रमातून पालघरमध्ये मतदान प्रक्रिया झाली सुकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

पालघर/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला. पालघरमध्ये १५ आणि १६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे २२ केव्ही उच्चवाहिनीचे ८९ खांब पडले. या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडलाला मोठा फटका बसला. २ रोहित्र, १९० उच्चदाब आणि २७३ लघुदाब वीजवाहिनीचे खांब या वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाले. २० मे रोजीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जनमित्रांनी अविरत परिश्रमाद्वारे सर्वच मतदान केंद्रावरील वीजपुरवठा सुरळीत केला. परिणामी संबंधित मतदान केंद्रावरील विशेषत: पालघर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुलभ झाली.

एकट्या मोखाडा शाखेतील ८३ तर खोडाळा शाखेतील ६ खांब पावसामुळे पडले. त्यामुळे खोच, पळसपाडा, घानवळ, नांदगाव, शिवली, झाप, पवारपाडा, चप्पलपाडा, सावर्डे या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनिल भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितिन संखे, उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण, शाखा अभियंता निखिल बनसोडे, किरण थाटे आणि जनमित्रांच्या टिमने कंत्राटदारांच्या कामगारांच्या मदतीने २२ केव्ही खोडाळा, २२ केव्ही खर्डी, २२ केव्ही मोखाडा फिडरवरील सर्व मतदान केंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत केला. दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने प्रसंगी ६०० मीटरपर्यंत खांद्यावर खांब वाहून जलदगतीने काम पूर्ण करण्यात आले. परिणामी २० मे रोजी संबंधित मतदान केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यात मदत झाली. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Related Posts
Translate »