महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी बिझनेस

खवा बर्फीची निर्मिती करून गावाने साधली आर्थिक किमया

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटसं ठीकपुर्ली गाव. साधारण 6-7 हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फी वरून आहे. या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील खवय्यांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते. इथले युवराज ढेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात. गावात गेल्या अनेक वर्षांपासून खवा बर्फी बनवली जाते 1990 च्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थाजन मिळतं हे लक्षात येऊ लागलं.यानंतर गावातील अनेक ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली. आणि हळूहळू ठीकपूर्लीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारा गाव अशी होऊ लागली.त्याच बरोबर खवा बर्फीची निर्मिती करून गावाने आर्थिक किमया साधली आहे.

बर्फी निर्मिती मुळे गावातील तरुणांच्या हाताला रोजगारही उपलब्ध झाला आहे. दररोज सकाळी सहा वाजता बर्फी बनविण्याच्या कामास सुरुवात होते. धगधगत्या चुलीवर दुधाला उकळी द्यायला प्रारंभ होतो. मोठ्या काहिलीत दहा लिटर दुधाचे आधण असते. गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्‍या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधण लागते. दीड ते दोन तासांत बर्फी तयार होते. जिभेवर येताचं वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते तर या व्यवसायातून लाखोंची कमाई होते.

Related Posts
Translate »