महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी

पालघर मध्ये रानभाज्याच्या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

प्रतिनिधी.

पालघर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींना रोजगार निर्मिती व्हावी व राणभाज्यांचे महत्त्व व परिचय जनतेला व्हावा यासाठी राणभाज्यांचे आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आज मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.कोसबाड हिल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांनी रानभाज्या महोत्सवात ठेवल्या रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धाची पाहणी केली.निसर्गात उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या, शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी रानभाज्या शरिराला आवश्यक आहेत. असे प्रतिपादन यावेळी खा.राजेंद्र गावित यांनी केले.तर आ.विनोद निकोले यांनी शरिर सदृढ ठेवण्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रानभाज्या औषधी वनस्पती असून प्रत्येकाने राणभाज्यांचे सेवन केले पाहिजे असे उद्गार यावेळी आ. श्रीनिवास वनगा यांनी काढले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आदिवासींच्या प्रदर्शनाची प्रशंसा करून अशा कार्यक्रमासाठी आदिवासींना जिल्हा प्रशासनातर्फे प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.रानभाज्याचे ४० स्टॉल तर पाककृती स्पर्धाचे १७ स्टॉल सदर महोत्सवात ठेवण्यात आले होते. सदर महोत्सवात भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांमधून तीन क्रमांकापर्यंत बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.सदर कार्यक्रमात विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, के.बी.तरकसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर,डॉ. विलास जाधव वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कषि विज्ञान केद्र कोसबाड ,सामजिक कार्यकर्ते जगन्नाथ हिलीम उपस्थित होते.


Related Posts
Translate »