नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या या रनधूमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर ते आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत आहे. राऊत यांनी याधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरेच आरोप लावले आहेत. पण यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. तसेच लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी हरणार असल्याचे ते म्हणाले. 4 जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल. देशात 70 वर्षांत त्यातील 50 वर्षापेक्षा जास्त काँग्रेसने प्रधानमंत्री दिला आहे, सर्वात चांगले प्रधानमंत्री झाले आहेत. या सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे तो देश विकण्याचा काम एकच प्रधानमंत्री करत आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. ज्यांच्याकडे बहुमत आहे तो त्या पदापर्यंत जाईल, दहा वर्षापर्यंत तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात. आमच्याकडे एकाहून जास्त चेहरे पंतप्रधान पदासाठी आहेत. एक सक्षम नेता या देशाचा पंतप्रधान बनणार आहे. यावर चर्चा होऊ शकते, त्यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही हे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेला संबोधित करताना महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. या वक्तव्यावरुन ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले “खरं तर काँग्रेसच्या राज्यात नाही, तर भाजपच्या राज्यातच महिलांचे मंगळसूत्र गहाण पडत आहेत. जो माणुस घरातल्या मंगळसूत्राला प्रतिष्ठा देऊ शकला नाही त्याने दुसऱ्यांच्या मंगळसूत्राची उठा ठेव करू नये. या देशातील महिलांची मंगळसूत्र का लुटली गेली का विकली गेली, मोदींनी नोट बंदी आणली त्यासाठी लाखो महिलांना मंगळसूत्र गहाण ठेवावी लागली, विकावी लागली. मोदींनी जे लॉकडाऊन केले हजारोंचा जो रोजगार गेला त्यावेळेला लाखो महिलांना आपले मंगळसूत्र विकून आपले घर चालवावे लागले. काश्मीर मधील पंडितांच्या पत्नींची मंगळसूत्र ही मोदी पुरस्कृत,भाजप पुरस्कृत दहशतवाद्यांकडून लुटली गेली. मणिपूर मध्ये देखील महिलांची मंगळसूत्र गेली त्याला देखील मोदी जबाबदार आहेत, किती मंगळसूत्रांची प्रतिष्ठा मोदींनी ठेवली आहे ?
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले “अमित शहा यांच्यावर “देशात काँग्रेसचे राज्य असताना शिवसेना अयोध्या आंदोलनात उतरली. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला हे तयार नव्हते. अमित शहा यांच्या पक्षाचे नेते सुंदर सिंग भंडारी यांनी स्वतः भाजपचा या घटनेची काहीही संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केले असल्याचं जाहीर केले होते. अमित शहा तेव्हा राजकारणात किंवा तिथे मैदानात तरी होते का ? तसेच अमित शहा यांच्यावर गोधरा हत्याकांड यावरून अनेक आरोप झाले होते. अमित शहा यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले की “गोधरा कांड करण्याइतके अयोध्या कांड सोपे नव्हते”
“4 जून नंतर एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे संपलेला असेल. तुम्ही कोणतेही गीत तयार करा किंवा अजून काहीही तयार करा एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट 4 जून नंतर या राज्याच्या राजकारणातून पूर्णपणे नामशेष झालेले असतील. या दोघांचा एकही खासदार निवडून येत नाही.” महाविकास आघाडीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी आपले विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीवर जहरी टीका केली.
महाविकास आघाडीचा सांगलीच्या जागेचा तिढा सुटला जरी असला तरी तनावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सांगलीच्या जागेवर कॉँग्रेस चा ठाम दावा होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी विसशाल पाटील ठाम राहिले आणि त्यांनी आता अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. आता यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. “सांगलीत भाजपने दोन उमेदवार दिले आहेत. आमच्या पैलवानाशी लढत द्यायला एक उमेदवार कमी पडत आहे, त्यामुळे भाजपने दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवला आहे. यावर आम्ही योग्य वेळी बोलू या मागे कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे कोणाची ताकद आहे? हे भाजपचा कारस्थान आहे. भाजपला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही आहे. चंद्रहार पाटील हे झपाट्याने पुढे जात आहे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे घराघरात भरलेले लिफाफे वाटण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षपणे दुसरा उमेदवार आणलाय का? या संदर्भात लोकांच्या मनात शंका आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
सुनेत्रा पवार यांना दिलेल्या क्लीनचीटवर संजय राऊत यांनी भाष्य केले. “भाजप वॉशिंग मशीनसह क्लीनचीटची फॅक्टरी देखील आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, विजय मल्ल्या, निरव मोदी या सर्व लोकांना देखील भाजप क्लीनचीट देऊ शकते. यांना जर निवडणुका जिंकायच्या असतील तर यांचा आधार त्यांना घ्यावा लागणार आहे. उद्या जर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना क्लीनचीट देण्याची बातमी आली तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.” असे राऊत म्हणाले.