नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक रोज एकमेकांवर नवनवीन आरोप प्रत्यारोप लावत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीकडून विनायक राऊत मैदानात आहेत. नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे.
“या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल. लोकसभा निवडणूक झाली की 16 पैकी दहा आमदार शिंदेंच्या गटात जातील. विनायक राऊत खासदार झाले तर त्यांना काय मिळणार ? मी खासदार झालो तर मला कॅबिनेट मिळेल. केंद्रात चारशे खासदार निवडून नेणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार” असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.



