महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

खाजगी मार्केटद्वारे विकला जाणार शेतकऱ्यांचा कांदा

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नाशिक/प्रतिनिधी – नाशिक मधील कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा कांदा हा अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत पडून आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या आडचणींना सामोरे जावे लागत आहे. एक एप्रिल पासून कांदा व्यापाऱ्यांनी हमाली तोलाई न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपायचे नावच घेत नाहीये. यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहे. येवला, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा,धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याने रोज होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल  ठप्प आहे.

या संदर्भात कांदा व्यापाऱ्यांची बैठक होणार असून पुढील रणनीती कांदा व्यापारी ठरवणार आहे. तरी जी हमाली तुलाई द्यावी लागते ती देणार नाही अशा निर्णयावर कांदा व्यापारी ठाम आहेत. कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्या मधील संघर्षामुळे जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी व्हा अन्यथा परवाने रद्द करू असे आदेश दिले असून सुद्धा कांदा व्यापारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.

आज देखील बाजार समितीत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व्यापाऱ्यांनी खाजगी मार्केट द्वारे शेतकऱ्याचा कांदा खरेदी करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आपला कांदा विकून थोडे फार पैसे कमवू शकतो. कारण संघर्ष हा कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये आहे पण गरीब शेतकऱ्यांची यात पिळवणूक होत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »