महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार – अजित पवार

NATION NEWS MARATHI ONLINE

धुळे/प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबाराची घटना घडली. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे, भाजप आमदार गणपत गायकवाडांनी ही गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच उल्हासनगर येथील गोळीबारांवरून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेण्याचे काही काम नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धुळ्यात दिली आहे. उल्हासनगर मध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजपा आमदार वैतागलेल्या माणसासारखे तो बोलत होते, संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असून, रात्री उशिरा त्याबाबत माहिती मिळाली. वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »