नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – विदर्भात सध्या कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु आहे, ह्या यात्रे दरम्यान लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या कडून यशोमती ठाकूर यांनी कडक कडक नोटा घेतल्याचा आरोप केल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन करत राणा यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर राणा दाम्पत्या विरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा करणार ठोकणार असल्याचे म्हणाल्या. असे होते तर लोकसभा निवडणुकीत नोटा वाटत असताना ईडी कुठे गेली होती? मागच्या निवडणुकीत आमदार रवी राणा यांनी पैसा वाटला होता त्याचा सुद्धा मागच्या प्रशासनाने देखील रिपोर्ट पाठविला आहे. त्यांनी अतिरिक्त खर्च केलेला आहे. याचा देखील रिपोर्ट गेला आहे. उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का ? या सगळ्या गोष्टींना लपविण्याच काम उपमुख्यमंत्री करतात. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
राणा दाम्पत्यावर वकीला मार्फत कायदेशीर कारवाई करणार असून निवडणूक विभागाकडे तक्रार देखील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.