महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

आदिवासींच्या मूलभूत हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेचा निर्धार मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम,

कल्याण/प्रतिनिधी – देशाच्या स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही आदिवासी कुटूंबांच्या त्यांच्या हक्कांच्या मुलभूत सुविधा देण्यास शासन व प्रशासन कुचकामी ठरले आहेत. आदिवासींच्या या मूलभूत हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने कल्याण तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात आला.
आज ही कल्याण तालुक्यातील आदिम आदिवासी कातकरी बांधवांकडे आपले हक्काचे रेशनकार्ड, आधार कार्ड, जातीचा दाखला, घरपट्टी, वीजमिटर, बँक खाते नाही. या शिवाय पिण्याचे पाणी, रस्ते, अंतर्गत रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या आदिवासी कुटूंबांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गरीब कुटूंबाची चेष्टा शासन करीत आहे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद ४६ भाग ४ मध्ये आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केलेला आहे. याचा राज्यकर्ते व शासन प्रशासनाला जणू विसर पडला असून याचा श्रमजीवी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी सर्व आदिवासी कुंटूंबांना तात्काळ आधार कार्ड द्या. सर्व आदिवासी कुटूंबांना घरकूल योजनेचा लाभ द्या. सर्व आदिवासी बांधवांना जातीचा दाखला द्या. आदिवासी वस्ती, पाड्यांमध्ये पिण्याचे पाणी द्या. आदिवासी पाड्यांना रस्ते व अतंर्गत रस्ते द्या. आदिवासी कुंटूंबांच्या घर,  झोपडीला घरपट्टी द्या. आदिवासी कुटुंबांना मोफत वीज मिटर द्या आदी मागण्या निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत शासनाकडे पोहोचविण्यात आल्या.

यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, तालुका अध्यक्ष विष्णु वाघे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण वाघे, ज्योती फसाले, महीला उपप्रमुख गिता फसाले, तालुका महिला प्रमुख धाकुबाई शेलके, लहु भोकटे, अरूण वाघमारे, श्रीपत जाधव, कांचन मुकणे, अनिता वायडे आदी पदाधिकारी आणि आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »