महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही – प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज़ मराठी टिम.

अकोला/प्रतिनिधी – दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही, असा आरोप वंचित बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. जनतेला आवाहन आहे की, तर तुम्ही जो पर्यंत स्वतःच बघणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही बघणार आहात की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा.

 तर अकोल्यात निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चात मराठा समाजाचे आमदार होते का? असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. तर ह्या मराठा समाजातील आमदारांनी गैरहजर राहून मराठा मोर्च्याकडे पाठ फिरवल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे. तर मतदान मागताना जात दिसते, निवडून आल्यानंतर सोयिस्कर रित्या पक्षाने परवानगी दिली नाही, असे सांगितले जाते. म्हणून आपला वापर होतोय हे रयतेच्या मराठ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, असेही बोलून जनतेने सावध पवित्रा घ्यावा असे आंबेडकर म्हणाले आहेत.

अकोला शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर खोचक भाष्य करणारे ट्विट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोला शहरातील पूल पडलाय त्यासंदर्भात महापालिका आयुक्त चौकशी का करत नाहीत, असा प्रश्न आंबेडकरांनी केला आहे. त्यातच अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत. खराब रस्त्यांचे फोटो ट्विट करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, “आश्चर्यचकित होऊ नका. हा चांद्रयान 3 द्वारे काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो नसून अकोल्यातील रस्त्यांचा फोटो आहे. आता अकोल्यात चंद्र आणण्यासाठी कोण जबाबदार आहे हे तुम्हीच ठरवायचं आहे!” असे खोचक भाष्य केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »