महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

राज्यात सत्ता संघर्षाचा वाद विकोपाला मात्र आ. राजू पाटील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे – राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षाचा वाद हा विकोपाला गेला आहे. मात्र या फुटीरता वादांच्या प्रकरणात न पडता नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल दिला आहे. बुधवारी दिव्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नंतर गुरुवारी सागाव मधील नागरिकांच्या समस्या मनसे आमदार राजू पाटील यांनी जाणून घेतल्या आहेत.

राज्यात नेते,आमदार,खासदार फुटीची प्रकरण गाजत आहेत. पक्षांतरासोबत नेते पक्षावर आणि चिन्हावर देखील दावा दाखवू लागले आहेत.मात्र आमदारांच्या मतदारसंघात असलेल्या समस्यांकडे आमदारांचे दुर्लक्ष सुरू आहे. या काळखंडात मनसे आमदार राजू पाटील सत्तांतराच्या राजकारणात न पडता मतदारांच्या समस्यांकडे लक्ष देत आहे. बुधवारी दिव्यात वाहतूक कोंडी आणि पाणी पुरवठा,खड्डे आदी समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या होत्या. तर गुरुवारी सागाव मध्ये जाऊन नागरिकांच्या पाणी,कचरा,गटार,नाले साफसफाई,महावितरणचे धोकादायक विजेचे खांब आदी समस्याच जाणून घेत तातडीने तोडगा काढून दिला आहे.

सागाव मधील नागरिकांना तातडीने आमदार निधी मधून जलवाहिनीसाठी दहा लक्ष रुपये देण्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.तसेच नागरिकांची खड्ड्यांच्या जाचामधून सुटका करण्यासाठी तातडीने खड्डे भरण्याचे आदेश देखील अधिकाऱ्यांना दिले आहेत.यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील,डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष मिलिंद म्हात्रे,माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांसह मनसेचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »