महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी मंजूर असलेला १४० व अमृत योजनेसाठी आरक्षित असलेला १०५ एमएलडी कोटा पाणी देण्यात आलेला नाही. शासनाने आरक्षित केलेला पाण्याचा कोटा अजून दिला नसल्याने कल्याण डोंबिवली मध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासनाने लक्ष दिल नसल्याने त्याची झळ आता कल्याण डोंबिवली महापालिकेला सोसावी लागत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील ऍलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशात पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा ३१/०८/२०२३ पर्यंत पुरवण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे. सदरची तूट भरून काढण्यासाटःई ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी दिनांक ०९/०५/२०२३ पासून आठवड्याच्या दर मंगळवारी २४ तास सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून मंगळवारी रात्री १२ पर्यंत केडीएमसी क्षेत्रात पाणी पूरवठा बंद असणार आहे. यामध्ये बारावे,मोहाली ,नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण क्षेत्रातून कल्याण पूर्व व पश्चिम,कल्याण ग्रामीण(शहाड,वडवली,आंबिवली टिटवाळा ) डोंबिवली पूर्व पश्चिम परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा हक्काचा पाणी पुरवठा हा सुरु झाला नसल्याने कल्याण डोंबिवली परिसराला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागू नयेत यासाठी आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी देखील उपस्थित करण्यात आली होती.व आज पर्येंत कल्याण डोंबिवलीकरांना हक्काचा पाणी कोटा मिळवून देण्यासाठी आ. राजू पाटील यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष केलं गेलं असल्याने आता कल्याण डोंबिवलीकरांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.त्यामुळे मुख्यमंत्री कल्याण डोंबिवली करांकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »