महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत वर्षावास समापन सोहळा,भव्य धम्म रॅली

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – आज समाजामध्ये डॉ बाबासाहेबांची जयंती अनेक मंडळात, विभाग आणि गटांमध्ये साजरी होते. समाज गटातटात विखुरला गेलेला आहे . समाजाला एकत्र करायचे असेल तर बौद्ध धम्मा शिवाय दुसरा पर्याय नाही. असे प्रतिपादन भन्ते राहुल बोधी यांनी डोंबिवली येथील वर्षावास सांगता सोहळा कार्यक्रमावेळी केले.

डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर येथे धर्मवीर आनंद दिघे सभागृहात वर्षावास सांगता समारंभाचे आयोजन बौद्ध समाज डोंबिवलीच्या वतीने करण्यात आले होते. त्या निमित्त कठीण चिवरदान सोहळा व भव्य धम्म रॅलीचा सोहळा पार पडला.या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सुमारे चाळीस भन्तेना उपासकांच्यावतीने चिवरदान करण्यात आले. याच कार्यक्रमात पुढे बोलताना भन्ते राहुल बोधी यांनी सांगितले की, वर्षावास ही बौद्ध धर्मात सुमारे अडीज हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. भारतात नव्हे तर जगात सुद्धा या परंपरेचे पालन होत आहे. वर्षावास ही संस्कृती आपल्या समाजात रुजली पाहिजे. आजच्या तरुण पिढीवर बुद्ध धम्म्माच्या विचाराचा प्रभाव पडल्यास भावी पिढी सुसंस्कृत होईल. बौद्ध समाजचा आर्थिक, सामाजिक विकास होऊन एक आदर्श समाज म्हणून जगासमोर यावा, यासाठी वर्षावासाचे नियोजन करण्यात आल्याचे भन्ते राहुल बोधी थेरो यांनी सांगितले.तर भन्ते डॉ. आनंद महाथेरो यांनी आपल्या देशात बुध्दांनी दिलेला शांततेचा संदेश प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजवला गेला तर जगात शांती नांदण्यास मदत होईल, असे प्रतिपाद केले. हा बुद्धांचा देश आहे. जगाला बुद्ध हवा युद्ध नको, असे सांगत सर्व बौद्ध समाजाने एक व्हावे असा संदेश उपासकांना दिला.

डोंबिवली शहरात गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळया विभागात वर्षावास वर्ग घेण्यात आले. त्या सर्वांनी मिळून सांगता समारंभाचे सामूहिक आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे संयोजन भन्ते राहुल बोधी थेरो यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक भन्ते डॉ.एन. आनंद महाथेरो उपस्थित होते. प्रा.रविकिरण मस्के, प्रा. धनंजय पगारे, आंबादास खंडागळे, रवि गुरचळ या नियोजन समिती सदस्यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन केले. सम्राट अशोक बुद्ध विहार-संजयनगर, देसले पाडा भोपर बौद्ध समाज मंडळ, धम्मदीप विहार-लोढा हेरीटेज, सम्यक धम्म सामाजिक संस्था -गांधीनगर, बौद्ध सेवा संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र-एमआयडीसी, यशोधरा महिला संघ-गणेशनगर, भीमगर्जना महिला मंडळ-त्रिमुर्तीनगर, लुंबिनी विहार-कोपर इ. ठिकाणी वर्षावास धम्मदेसना घेण्यात आल्या.

धम्म रॅलीचे स्वागत आणि सभागृह व्यवस्था सम्यक धम्म सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डी.डी.जाधव, कार्यकारी मंडळ व महिला मंडळ यांनी पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संवर्धन संस्थेने स्मारकाचे सुशोभिकरण व रॅलीचे नियोजन केले. भारती फौंडेशनतर्फे पाणी वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , सुरेंद्र ठोके, निलेश कांबळे कल्पना चौधरी, कुसुम खंडागळे, महेंद्र जाधव, सुहास रोकडे, संजय गौतम, विजय इंगोले, रवी इंगोले, गुलाब खंदारे, आशिष कांबळे, श्रीकांत माने, विलास खंडिझोड, राष्ट्रपल ढोबळे, बाजीराव माने, अर्जुन केदार इ. विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डोबिवलीतील बौद्ध समाज उपस्थित होता.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »