महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

प्रतिनिधी.

यवतमाळ – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. मात्र यात शिथिलता मिळाल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेले मजूर मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात परत आले आहेत. दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी या मजुरांना आता कामाची गरज आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देऊन ‘मागेल त्याला काम’ या प्रमाणे प्रत्येकाला काम उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिल्या.
नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात जवळपास 66 हजार लोक बाहेरून आले आहेत. यात मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना तहसीलदार आणि गटविकास अधिका-यांनी जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दहा कामे सुरू केली तर जवळपास 12 हजार कामे सुरू होऊ शकतात. त्यामुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होईल. नरेगाच्या कामांना मजुरांची कमतरता नसून कामाबाबत अधिका-यांनी योग्य नियोजन करावे. कृषी विभागाचा आढावा घेतांना ते म्हणाले, बोगस बियाणे साठवणूक, त्याची वाहतूक व विक्री यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे.
इतर राज्यात मान्यता असलेल्या बियाणांना आपल्या राज्यात बंदी आहे. अशा बियाणांची विक्री होऊ देऊ नये. तसेच जास्त दराणे बियाणे विक्री, अनधिकृत बियाणे आणि खतांच्या विक्रीवर गांभीर्याने लक्ष द्या. दोन वर्षांपूर्वी किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकरी / शेतमजुर यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे सुरक्षा किट वापराबाबत शेतक-यांमध्ये जनजागृती करा. तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी याप्रकरणी समन्वय ठेवून काम करावे. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी कोव्हीड – 19, कृषी, कापूस खरेदी, मग्रारोहयो आदी विषयांचा आढावा घेतला. तत्पूर्वी डॉ. विजय डोंबाळे यांनी कोव्हीडबाबत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी कोरोना संदर्भातील उपाययोजना, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पराग मगर यांनी पिकांवर टोळ धाड याबाबत सादरीकरण केले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता राठोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

Related Posts
Translate »