महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे थोडक्यात

पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण– आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये चिमुकल्sया वारकऱ्यांनी विठूरायाच्या गजरासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला पाहायला मिळाला. आषाढी एकादशीचे औचित्य साधून कल्याणातील नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे या बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
एकीकडे हातामध्ये टाळ मृदंगाच्या नादात विठू माऊलीचा गजर तर दुसरीकडे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणारे फलकातून जनजागृतीही केली जात होती. आपली संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीला समजावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणातील नामांकित बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे चिमुकल्या वारकऱ्यांची ही आनंदवारी आयोजित करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेच्या टिळक चौकातून निघालेली ही दिंडी माता अहिल्यादेवी होळकर चौक, शंकरराव चौक करत छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली. ज्यामध्ये १ ली ते ४ थ्या इयत्तेतील तब्बल ५०० चिमुकले वारकरी सहभागी झाले होते. तर त्यांच्यातील विठ्ठल रुख्मिणी, संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी या दिंडीची शोभा अधिकच वाढवली. तर यंदा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसोबत संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केडीएमसीचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या प्रमूख उपस्थितीत या दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर वर्गाने ही ही दिंडी यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »