महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे महत्वाच्या बातम्या

शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा

नेशन न्यूज मराठी टीम.

शहापूर – केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाच्या (आरईसी) अर्थसाह्यातून राज्यात राबवण्यात आलेल्या सौभाग्य योजनेमुळे लाभार्थ्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लागला. या योजनेमुळे मुलभूत गरज असलेली वीज गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात महावितरणला मदत झाल्याचे प्रतिपादन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले.

शहरी व ग्रामीण भागात घरोघरी वीज पोहचवण्यात सौभाग्य योजनेचा मोलाचा वाटा आहे. ही योजना राबवताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतू महावितरणने कंत्राटदारांच्या मदतीने गरजूंच्या घरी प्रकाश पोहचवण्याची ही योजना यशस्वी केली. आरईसीच्या श्रीमती सरस्वती यांनीही महावितरणमुळे ही योजना यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करतानाच या योजनेतून राज्यभरातील ५ लाख ५८ हजार ७०४ कुटुंबियांना वीजजोडणी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

योजनेतील लाभार्थ्यांनी त्यांच्या मनोगतात आरईसी व महावितरणच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच उपस्थितांना एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. शहापूर तालुक्यातील योजनेचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी आरईसीच्या मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक सरस्वती चंद्रशेखर, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे व किशोर उके, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार, श्रीनिवास बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »