महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पर्यावरण लोकप्रिय बातम्या

नदीच्या शेजारी डंपिंग ग्राउंड असणे हा सर्वात मोठा अपराध आहे – वॉटरमॅन राजेंद्र सिंह

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

https://youtu.be/GE_-4FARHGk

कल्याण – कल्याण खाडीसह उल्हास आणि वालधुनी नदी अखेरच्या घटका मोजत आहे. आणि शासन तर या नद्यांना नाले बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची उद्विग्न टिका देशाचे वॉटरमॅन अशी ओळख असणाऱ्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्या राजेंद्र सिंह यांनी कल्याणात केली. राजेंद्र सिंह यांनी आज कल्याण खाडीसह उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूरमधील उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या दुरवस्थेची जागरूक नागरिक, विद्यार्थ्यांसोबत पाहणी केली.

आपण आज उल्हानगर, अंबरनाथ बदलापूर येथील नद्यांची पाहणी केली, त्यांना आपण नदी बोलूच शकत नाही. ते एका घाणेरड्या नाल्याप्रमाणे दिसून येत असल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी बोलून दाखवली. तसेच जर इथली लोकं जागरूक नसती तर शासन दरबारी आज या नद्यांची नाले अशीच नोंद झाली असती. आणि आपले सरकार या नद्यांना नाले बनवण्यात प्रयत्नशील आहे. मुंबईतील 5 नद्यांनाही त्यांनी नाले बनवलं होते. परंतु आम्ही अशाच प्रकारे सर्व नद्यांची पाहणी करून शासन दरबारी त्यांची नदी अशी नोंद करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तर या नद्या सध्या आयसीयूमध्ये असून त्यांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले नाहीत तर या नद्या वाचणार नाहीत. तर कल्याण खाडीशेजारी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या खाडीशेजारी असणारे डंपिंग ग्राउंड हा सर्वात मोठा अपराध असून नदीशेजारी कधीही डंपिंग ग्राउंड असता कामा नये. या डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याच्या रासायनिक घटक पाण्यात मिसळतात आणि तिथली जमीन पूर्णपणे पडीक बनत असल्याने तातडीने शासनाने ते बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान यावेळी वॉटर मॅन राजेंद्र सिंह यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांच्यासह विविध जागरूक नागरिक आणि कल्याणातील एका खासगी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना राजेंद्र सिंह यांनी नद्या वाचवण्याचे महत्व अधोरेखित करून सांगितले. तसेच त्यांच्या परीने नद्या वाचविण्याच्या मोहिमेत हातभार लावण्याचे आवाहनही केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »