महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी महाराष्ट्र

पाण्यासाठी ग्रामस्थांचा लढा,मजिप्रा कार्यालयात ३ तास ठिय्या

 

अमरावती/प्रतिनिधी – राज्यातील अनेक गावांमध्ये एकीकडे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत (Natural sources) आटल्याने संकट ओढावले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या मनमानिमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या वंडली (Vandali) गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावामधील दोन गटात पाण्यावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. मालटेकडी जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात प्रहारचे वसु महाराज व ग्रामस्थांनी ३ तास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या घेतला. गावाला पाणीपुरवठा करणारा वॉलमन दुजाभाव करतो आहे आणि त्याला अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे, असा आरोप गांवकऱ्यांकडून करण्यात आला.

८ दिवसात गावातील प्रत्येक घरामध्ये सुरळीत आणि एक सारखा पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ, महिला व लहान मुलांना घेऊन मोठे आंदोलन करू अस इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अर्ध्या गावात पाणी मिळते आणि अर्ध्या गावात नाही असे ग्रामस्थांचे मत आहे. टाकीमध्ये पाणी असताना अर्ध्या गावाला पाणी का मिळत नाही याची आम्ही चौकशी सुरू केली आहे. वॉलमन, सुपरवायझर, कंत्राटदार यांना धारेवर धरून पाणीपुरवठा करताना दुजाभाव होऊ नये यासाठी उपाय योजना आम्ही करतो आहे. आज किंवा उद्या याचा परिणाम दिसून येईल. तरीही वॉलमन योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.

 

Related Posts
Translate »