महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image बिझनेस लोकप्रिय बातम्या

आम्ही कंपन्या स्थलांतरित करणार नाही, सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढू- कामा संघटना

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील 156 रासायनिक कारखाने दुसरीकडे स्थलांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता त्यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला असून स्थानिक नागरिकांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच एमआयडीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये डोंबिवलीतील रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक अशा 156 रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसर हा वायू प्रदूषण, आग आणि कंपनीतील अपघातांमुळे चर्चेत राहिला आहे. तर काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याठिकाणी भेट देत वेळ पडल्यास इथल्या घातक रासायनिक कंपन्या स्थलांतरित करू असे आश्वासन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी सुमारे 400 च्या आसपास सर्व प्रकारच्या कंपन्या असून त्यामध्ये 2 लाखांच्या आसपास कामगार काम करतात. तर या कंपन्या स्थलांतरित केल्यानंतर त्यांच्या जागी व्यापारी, अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान आदी विभागातील कंपन्या आणण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

तर डोंबिवली एमआयडीसीमधील घातक रासायनिक कंपन्यांविरोधात बरीच आंदोलनेही झाली आहेत. त्यामुळे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मात्र याठिकाणच्या कंपन्यांची प्रमूख संघटना असणाऱ्या ‘कामा’ संघटनेने या निर्णयाला तीव्र शब्दात निषेध करत त्याविरोधात सर्व ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी दिली.

याबाबत कामा संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ.देवेन सोनी यांना विचारले असता ते म्हणाले,डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील धोकादायक आणि अतिधोकादायक एकूण १५६ कंपन्यांचे डोंबिवली येथून पनवेल पुढील पाताळगंगा येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आम्हाला प्रसिद्धी मध्य्माकडून कळाले.
औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे कामा संघटना गेली कितेक वर्ष प्रतिनिधित्व करत आहे.असून देखील याची आम्हाला सरकारने माहिती दिली नाही. संघटनेच्या वतीने आम्ही सरकारच्या अन्यायकारक निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवतो.उद्योजकांची मानसिकता, शारीरिक कुवत आणि वयाचा विचार करता कोणताही उद्योजक स्थलांतरासाठी तयार होणार नाही.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये सर्वात आधी उद्योग आलेले असून त्यानंतर रहिवासी इमारती झाल्या आहेत. निवासी वसाहती आमच्या जवळ आल्या असून आम्ही त्यांच्याजवळ गेलेलो नाहीये. तरीही आम्हालाच बाहेरच रस्ता दाखवला जात असल्याचे कामा संघटनेचे माजी अभय पेठे यांनी सरकारचा निर्णय अनाकलनीय असल्याचे सांगितले.

तर इथले उद्योग स्थलांतरित करायचे म्हणजे खायची गोष्ट नाहीये. इथली मशीनरी, प्लांट आम्ही कसे हलवणार ? त्याशिवाय कामगारांचे पुनर्वसन कसे करणार? आमच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर उद्योग व्यवसायांचे काय? आदी प्रश्न कामा संघटनेच्या संजीव काटेकर यांनी सरकारला विचारले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »