महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कायद्याच्या चौकटीत राहून वाहने चालावा, कल्याण वाहतूक पोलिसांचे जनतेला आवाहन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असतानाच बेशिस्त रिक्षा चालकांमुळे त्यात अजून भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण ट्रॅफिक पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज सकाळी कल्याण स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली.

स्मार्ट सिटीचे काम सुरू होण्यापूर्वीही कल्याण स्टेशन परिसर शेकडो रिक्षा उभ्या -आडव्या कशाही पध्दतीने लावून इतर वाहनांना अडथळा निर्माण करणे हि बेशिस्त रिक्षा चालकांना नवीन बाब नाही. मात्र याचा नाहक त्रास हा सामान्य नागरीकांना सहन करावा लागतो. नागरिकांचीही रिक्षांच्या गर्दीतून वाट काढताना दमछाक होण्याचे चित्र सकाळ व संध्याकाळी कल्याण स्टेशन परिसरात पहावयाला मिळते. त्यातच गेल्या काही महिन्यांपूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमूळे वाहतूक कोंडीत भर पडण्यासह नागरिकांनाही स्टेशनवरून बाहेर पडण्यास आणि स्टेशनवर जाण्यास अडथळा येत होता. त्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्याने कल्याण शहर वाहतूक पोलीस आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कारवाई केली.

यावेळी स्टेशन परिसरातील सुमारे 800 ते 1 हजार रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. कल्याण आरटीओकडून 41 आणि वाहतूक पोलिसांकडून 44 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून आरटीओचे सुधारित नियम लागू करण्यात आले असून त्यात पूर्वीपेक्षा अधिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबतही नागरिक आणि वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहनही तरडे यांनी यावेळी केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »