महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार,२१ नगरसेवकांनचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

उल्हासनगर/प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसने उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे.भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक मा.खा.आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला.यावेळी सौ.पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देखील दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली. उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र,आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे.

टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे 21 नगरसेवक, 19 माजी नगरसेवक, वरप,कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे 114 जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीय रित्या वाढली आहे.भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणार्या नगरसेवकांमध्ये पंचम ओमी कलानी, डिंपल ठाकूर नगरसेविका तथा सभापती सार्वजनिक बांधकाम विभाग, शुभांगी निकम नगरसेविका, दिपा पंजाबी टिपीडी चेअरमन तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, छाया चक्रवर्ती – सभापती प्रभाग समिती 2 तथा नगरसेविका, हरेश जग्यासी सभापती – प्रभाग समिती 1 तथा नगरसेवक, कविता गायकवाड, महसूल सभापती तथा नगरसेविका, दिप्ती दुधानी, सभापती प्रभाग समिती 3 तथा नगरसेविका, दिनेश लहिरानी परिवहन समिती सभापती, रेखा ठाकूर – नगरसेविका, सरोज टेकचंदानी – नगरसेविका, आशा भिराडे – नगरसेविका, सविता तोरणे-रगडे – नगरसेविका, रविंद्र बागुल – नगरसेवक, मनोज लासी, नगरसेवक, चंद्रावती देवीसिंग, नगरसेविका, ज्योती पाटील – नगरसेविका, ज्योती चैनानी – नगरसेविका, गजानन शेळके यांचा समावेश आहे. तर, कांबा व म्हारळ ग्रामपंचायतीचे भारती भगत सरपंच – कांबा गाव, संदिप पावशे उपसरपंच – कांबा गाव, निलेश देशमुख उपसरपंच – म्हारळ गाव, हरिदास पवार सदस्य – कांबा गाव, संतोष पावशे सदस्य – कांबा गाव, ईशा भोईर सदस्य – कांबा गाव, सोनाली उबाळे सदस्य – कांबा गाव, छाया बनकर सदस्य – कांबा गाव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच माजी नगरसेवक दर्शनसिंग खेमानी, मोहन गारो, राजू खंडागरे, होशियारसिंग लबाना, बाबू मंगतानी, लोकूमल कारा, हिरो केवलरामानी, ठाकूर चांदवानी, श्याम मेजर, मिनू दासानी, प्रिथ्वी वलेचा, राजू टेकचंदानी, गिरीधारी वधवा, भगवान लिंगे, फिरोज खान, गोदू क्रिष्णानी, गजानन बामणकर, आंबू भटिजा, कमला क्रिष्णानी, बिस्कीट उत्पादक संघटनेचे अध्यक्ष नोनी धनेजा यांनीही यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर,

आरपीआय नगरसेवक आणि पीआरपी नगरसेवक यांनीही राष्ट्रवादीला सहयोगी राहणार असल्याचे यावेळी जाहीर केले. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर मधील ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »