महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती करणार कचऱ्यापासून खत निर्मिती

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज शेकडो गाड्या फळ, भाज्या, फुले आणि धान्याची आवक होत असते. यातून सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असतो. महानगरपालिकेने देखील डम्पिंग ग्राउंड बंद केल्याने आता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असून यातून खत निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लागणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.

 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिका आणि बाजार समिती यांच्यात कचऱ्या उचलण्याच्या वादातून अनेक वेळा याठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद केल्याने त्या अनुशंगाने ठराव घेऊन स्वताचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून या ठरावाला १८ ऑक्टोंबर रोजीच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बाजार समितीचं स्वताच कचऱ्या पासून खत निर्मिती प्रकल्प उभा राहणार असल्याचे कचऱ्याचा प्रश्नच राहणार नाही.

  कचऱ्याचा जो काही प्रश्न दिसतो तो फुलमार्केट मधील जे गाळे महापालिकेच्या ताब्यात आहेत, ज्यांचं भाडं, टॅक्स  महापलिका घेते, ते त्यांचा कचरा उचलत नाहीत त्यामुळे त्याठिकाणी कचरा दिसत असतो. बाजार समितीचा जो कचरा आहे तो नियमितपणे कंत्राटदारामार्फत उचलला जात आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत अन्नधान्य बाजार, भाजीपाला बाजार, फुल बाजार, बैलबाजार यामधून एकूण ५ टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये पालेभाज्यांचा कचरा उचलण्यासाठी वेगळा ठेकदार नेमला असून पशुखाद्यासाठी हा कचरा उचलला जातो. त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता नसते. इतर जो कचरा आहे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ५ टन क्षमता असलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु करत असल्याने यापुढे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचऱ्याची समस्या उद्भवणार नसल्याची माहिती सभापती कपिल थळे यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »