महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे मुख्य बातम्या

एक लस घेतलेल्या नाका कामगारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या – महाराष्ट्र जनरल मजदुर संघटना

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – नाका कामगारांचे पोट हातावर आहे. गेले दोन वर्ष मोठ्या प्रमाणत या नाका कामगारांनी कोरोना काळात संयम राखत काम बंद ठेवले. मात्र या काळात त्यांना स्वतःला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अशा नाका कामगारांसाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकत ज्या कामगारांनी एक लस घेतली आहे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र एक लस घेतल्यानंतर दुसरी लस घेण्यासाठी ८४ दिवसांचा कालावधी लागत असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. त्यातच ज्या व्यक्तींना नुकताच कोरोना झाला आहे त्या व्यक्तींना 90 दिवस पूर्ण झाल्याशिवाय लस घेता येत नाही मात्र अशा व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. त्यामुळे लस घेण्यासाठी दोन लसी मधील अंतर कमी करावं अशी मागणी महाराष्ट्र जनरल मजदुर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ , माणिक उघडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली आहे. इतकेच नव्हे तर एक लस झालेल्या नाका कामगारांना रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली तर नाका कामगारांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. टाळेबंदीमध्ये या कामगारांचे हाल झाले आहेत. त्यामुळे आता हे हाल थांबणे आवश्यक असून त्यांना प्रवास करण्याची मुभा मिळावी. एकूण ७००० नाका कामगार असून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, आंबिवली, टिटवाळा आदी ठिकाणाहून हे कामगार येत असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.निवेदन देते समयी मजदूर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राणा शेठ, नवनाथ मोरे, रामेश्र्वर काळे महाराज, ज्ञानेश्वर भोसले, बाजीराव माने, उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »