महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

अस्वस्थ मनाचे अलक’ आणि ‘कौल’ या कथासंग्रहांचे प्रकाशन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेल्या ‘अस्वस्थ मनाचे अलक’ आणि ‘कौल’ या दोन कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयात पार पडला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत, अकोला हे होते.  तर उद्घाटक म्हणून अंजली साळी या होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिकचे प्रकाशक तानाजी खोडे, दोन्ही कथासंग्रहाचे लेखक प्रभाकर पवार मुरबाड, ज्येष्ठ लेखक भिकू बारस्कर मुंबई, सेवानिवृत्त मेजर विवेक बोडस, सुधाकर पवार, अपर्णा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वेगळेपण ठरलेली बाब म्हणजे लेखकाने त्यांचे दोन्ही पुस्तकं त्यांच्या शिक्षिका असलेल्या अंजली साळी बाईंना अर्पण केली आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा खुद्द दस्तुर आपल्या आई-वडिलांच्या हस्ते केला. रितसर विचारपीठावरील मान्यवरांसमवेत दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करून अंजली साळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 

भिकू बारस्कर यांनी ‘कौल’ कथासंग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प्रभाकर पवार यांच्या कथा शैली, ग्रामीण विषय आणि घटनानुक्रमांची ह्या आगळ्यावेगळ्या लेखन शैलीवर भाष्य केले. पवार यांच्या कथा कशाप्रकारे समाजभान जोपासणाऱ्या आहेत ते स्पष्ट केले.  त्यांची गर्भार कथा ही कशी प्रेमाचे धुमारे फुलविणारी आहे, ते स्पष्ट करून सांगितले. त्यानंतर मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक माननीय मुकुंद देशपांडे, यांनी प्रभाकर पवार कथाविषयक काही बाबींवर प्रकाश टाकताना मोलाचा संदेश दिला. नवीन साहित्यकृती निर्माण करताना , नवनवीन साहित्य प्रकार हाताळायला हवे. सूक्ष्म निरीक्षण आणि चिंतनात्मक लेखनाचा प्रवास करावा अशा प्रकारचा संदेश दिला.  

ज्ञानसिंधु प्रकाशनाचे प्रकाशक तानाजी खोडे नाशिक यांनी लेखक प्रभाकर पवार यांच्या पुस्तकाची निर्मिती करताना येणारे अनुभव कथन केले. कौलमधील कथांमध्ये असलेला जिवंतपणा वाचकासमोर वास्तव रूपाने उभा राहतो. यांची आत्मानुभूती कथा वाचल्याखेरीज येणार नाही. प्रभाकर पवार यांनी साकार केलेली ही साहित्यकृती साहित्यामध्ये निश्चितच वेगळा आयाम निर्माण करणारी आहे असे स्पष्ट मत मांडले. 

उद्घघाटक अंजली साळी यांनी आपले प्रभाकर पवारविषयीचे गोड कडू अनुभव कथन केले. शिक्षकांच्या एखाद्या बोलण्याने विद्यार्थ्यावर होणारा परिणाम म्हणजे कौल कथासंग्रह अशी थोडक्यात व्याख्या केली आणि आपल्या अनुभवातून प्रभाकर पवार सर्वांसमोर उभे केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »