महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांची महावितरण कडून विशेष तपासणी मोहिम

कल्याण/संघर्ष गांगुर्डे  – एकीकडे वाढलेल्या वीजबिलांमूळे लोकं चिंतेमध्ये असताना दुसरीकडे मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महावितरणच्या कल्याण परिमंडळात तब्बल 20 टक्के ग्राहकांचा वीज वापर 30 युनिटपेक्षा कमी किंवा असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. त्यामूळे अशा 30 युनीटपेक्षा कमी वापर असणाऱ्या तब्बल 4 लाख 44 हजारांहून अधिक ग्राहकांची महावितरणतर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करून महसूल वाढीच्या उद्देशाने ३० जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

कल्याण परिमंडळात आतापर्यंत ३० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 4 लाख 44 हजार 238 असून त्यापैकी 3 हजार ग्राहकांची नुकतीच पडताळणी करण्यात आली. ज्यात बहुतांश ठिकाणी नादुरुस्त किंवा बंद वीजमीटर, मीटरचे सील तुटणे, घराच्या आत मीटर असणे, मीटरशी छेडछाड किंवा वीजचोरी, वीजभारात बदल, चुकीचे रिडींग आदी बाबींमुळे वीजवापर कमी असल्याचे आढळून ल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
यामुळें होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरणकडून सर्वच्या सर्व ग्राहकांच्या पडताळणीची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असणाऱ्या कल्याण मंडल कार्यालय 1अंतर्गत असे सुमारे 80 हजार 849 तर ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि उल्हासनगरचा समावेश असणाऱ्या मंडल कार्यालय 2 अंतर्गत 1 लाख 3 हजार 435, वसई -विरारचा समाविष्ट असणाऱ्या वसई मंडळ कार्यालयांतर्गत सर्वाधिक १ लाख ५६ हजार ६६१ आणि पालघर जिल्ह्याचा समावेश असलेल्या पालघर मंडळात 1 लाख 3 हजार 293 ग्राहकांचा दर महिन्याचा वीज वापर ३० युनिटपेक्षा कमी असल्याचे महावितरणला आढळून आले आहे. त्यामुळे या सुमारे साडेचार लाख ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे.

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु असून तपासणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विभाग तसेच उपविभागीय स्तरावर विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून मोहिमेच्या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. या तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी ग्राहकांना केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »