DESK MARATHI NEWS NETWORK
कल्याण/प्रतिनिधी –कल्याण पश्चिमेत भाजपच्या तिरंगा रॅलीवरून पोलीस आणि भाजप आमनेसामने आले . तिरंगा रॅलीच्या मार्गाला आक्षेप घेत बाजारपेठ पोलिसांनी भाजप नगरसेवकाला कलम १६८अंतर्गत नोटीस बजावली. या नोटीसच्या विरोधात भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांनी थेटहायकोर्टात धाव घेतली. माझ्या देशात तिरंगा रॅली काढायची नाही का ? असा संतप्त सवालभाजपकडून उपस्थित करण्यात आला. हायकोर्टाच्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी त्यांचे म्हणणेमांडले नाही. त्यामुळे हायकोर्टाने तिरंगा रॅलीला परवानगी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचीनोटिस मागे घेतली आहे.
कल्याण पश्चिमेत स्वातंत्र्य दिना निमित्त भाजप जुने कल्याण शहर मंडळाच्या वतीने तिरंगा रॅलीचंआयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता अहिल्याबाईचौकातून रॅलीला सुरुवात होऊन टिळक चौक, पारनाका, दूधनाका, गांधी चौक, शंकरराव चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार होता.यासाठी भाजप सरचिटणीसअन्वेश जोशी यांनी १० ऑगस्ट रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र अवघ्या एका दिवसात पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अंतर्गतभाजपला नोटीस बजावली. रॅलीचा मार्ग पारंपरिक नसल्याचे सांगत पोलिसांनी १९९९ मध्येतत्कालीन ठाणे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचा हवाला दिला. पारंपरिक मिरवणुकांव्यतिरिक्त इतर मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असा आदेश असल्याचं पोलिसांनी नोटीसमध्येनमूद केले. त्यामुळे भाजपमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले. पोलिसांची नोटीसमिळाल्यानंतर भाजप नगरसेवक अमित धाक्रस यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली. दरवर्षीआम्ही तिरंगा रॅली काढतो.काही अडचण असेल तर पोलिसांनी आम्हाला बोलावून मार्गकाढायला हवा होता. मात्र रॅलीच काढू नये, अशा पद्धतीची नोटीस देण्यात आली, असा आरोपत्यांनी केला तसेच, मी भारतीय नागरिक आहे की नाही? माझ्या तिरंग्याची रॅली मी काढायचीनाही ? असे पोलिस प्रशासन कसे सांगू शकते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणावर हायकोर्टात सुनावणी झालीय न्यायालयात पोलिसांकडून न्यायालायत काही म्हणणेमांडले गेले नाही. त्यामुळे न्यायालयाने भाजपला न्यायालयाने परवानगी दिली आहे. भाजपलादिलेली नोटीस पोलिसांनी मागे घेतली आहे. भाजपचा हा न्यायालयीन विजय असल्याो सांगत धाक्रस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांनी सांगितले की, पोलिसांनी तिरंगा रॅलीची परवानगी नाकारली नव्हती. दरवर्षी रॅली पारनाका मार्गावरून जाते. मात्रयावेळी दूध नाका मार्गाने रॅली काढण्याची परवानगी मागण्यात आली होती. हा परिसरसंवेदनशील असल्याने वरिष्ठांकडून परवानगी घेण्याबाबत भाजपला नोटीस देण्यात आली होती. पोलिसांची नोटीस देताना १९९९ च्या आदेशाचा हवाला दिला होता.
भाजपने हायकोर्टात धाव घेतल्यावर पोलिसां माघार घ्यावी लागली. या घडामोडीनंतर कल्याणपश्चिमेतील भाजपच्या तिरंगा रॅलीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आता १५ ऑगस्टला तिरंगारॅली नियोजित मार्गावरून निघणार आहे. या रॅलीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.



