महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मुस्लिम संघटना उतरणार आंदोलनात

प्रतिनिधी.

मुंबई – केंद्र सरकारने तीन कृषीविधेयक बिल पारित केले. ते बिल मागे घेण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र केंद्र सरकार त्यांना दाद द्यायला तयार नाही. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच अनेक मुस्लिम संघटना येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करणार असून त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे या आंदोलनाचे स्वरूप असेल.केंद्रात सत्तेवर आलेले भाजपा सरकार मनमानी कारभार करीत असून देश विरोधी कायदे तयार करीत आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होत आहे. सीएए व एनआरसी हे त्यापैकीच तयार करण्यात आलेले कायदे आहेत. याला देशातील अनेक नागरिकांनी विरोध केलाय. आता केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी कायदे केले असून नुकतेच तीन कृषी विधेयक बिल पास केले आहे. त्याचा फायदा केवळ मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्य शेतकरी मात्र या कायद्यामुळे अडचणीत आला आहे. कृषी विधेयक बिल मागे घेण्यात यावे म्हणून गेले दोन महिने शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार हे बिल मागे घेण्यास तयार नाही. यापूर्वी शाईन बाग आंदोलनात सर्व धर्मियांनी सहभाग घेऊन मोठे आंदोलन केले होते. आजही कृषी विधेयक बिला विरोधात आंदोलन चालू असून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शाईन बागच्या धर्तीवर किसान भाग आंदोलन करण्याचा इशारा मुस्लिम संघटनांनी दिला असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या २७ जानेवारी रोजी राज्यातील विविध भागात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Related Posts
Translate »