महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

प्रतिनिधी.

सोलापूर – पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून सजीव सृष्टी उदयास आली. त्यानंतर मानवाने प्रगती करत पृथ्वीवर वैभव प्राप्त केले. पृथ्वीवरील सर्व व्यवस्था व वैभव ही निसर्गावर आधारित असून त्याचे जतन होणे आवश्यक असल्याचे मत नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि बर्डलाइफ आंतरराष्ट्रीय संस्थेचे समन्वयक डॉ. अनुज जैन यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भूशास्त्र संकुलामधील पर्यावरणशास्त्र विभागाकडून “बायोमिमिक्री आणि शाश्वत विकास” या विषयावर एक दिवशीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यात डॉ. जैन यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांची ओळख करून दिली. प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जैन यांनी बायोमिमिक्स म्हणजे काय? याचा दैनंदिन जीवनात तसेच राहणीमानात कसा फायदा होतो, हे स्पष्ट केले. मानवी समस्या सोडविण्यासाठी प्रकृति, मॉडेल्स, प्रणाली, प्रक्रिया आणि घटकांचे अनुकरण करणे किंवा प्रेरणा घेणे या घटकांची तपासणी करणे इत्यादी बाबींचा समावेश म्हणजे बायोमिमिक्स. बायोमिमिक्स आणि शाश्वत विकास यामध्ये परिपत्रक अर्थव्यवस्था, जीवन तत्त्वे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. बायोमिमिक्री अभ्यास म्हणजे निसर्गापासून शिकण्याचाच एकात्मिक दृष्टीकोन आहे, असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या मते बायोमिमिक्री आणि बायोमिमेटिक्स हा शब्द ग्रीक बायोसमधून आला आहे. ज्याचा अर्थ जीवन आणि मायमेसिस आहे, ज्याचे अनुकरण करणे आहे, हे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या वाढते पर्यावरण प्रदूषण, रोगराई, पर्यावरणीय संकटे इत्यादींमुळे त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, यासाठी बायोमिमिक्रीचा सर्वानी विचार केला तर तो एक प्रकारचा शाश्वत विकास ठरेल, असे सांगितले. निसर्ग हा आपल्या सर्वांचा गुरु आहे. आपण निसर्गापासूनच बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, जसे कि विभक्त कुटुंब पद्धती हे आपण पक्ष्यांपासून शिकू शकतो तसेच स्तलांतरित पक्षांचे वाढते प्रमाण त्याच्यामधील रंगाचे महत्व यावर ही मार्गदर्शन डॉ. फडणवीस यांनी केले. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. डॉ. श्रीराम राऊत व प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी तांत्रिक सहाय्य केले.

Related Posts
Translate »