महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
लोकप्रिय बातम्या

१८ गावांतील विकासकामे थांबवा केडीएमसी आयुक्त यांचा आदेश, मा.नगरसेवकाने फोडले आयुक्तांवर खापर

प्रतिनिधी.

कल्याण – केडीएमसीतील वगळलेल्या १८ गावांमधील १३ नगरसेवकांचे पद रद्द झाले असतानाच आता त्या गावांमध्ये महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली अथवा प्रस्तावित असलेली कामे थांबविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. या आदेशामुळे गावांमध्ये प्रामुख्याने अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठ्याच्या कामांना तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.तर त्या गावातील पद रद्द केलेले नगरसेवक (माजी नगरसेवक) भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी याला विरोध करत आयुक्तांवर खापर फोडत या निर्णया विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

केडीएमसीतील २७ गावांमधील १८ गावे राज्य सरकारने वगळली आहेत. त्यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणोरे, वसार, आशेळे, नांदिवलीतर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे ही गावे आहेत. १८ गावे वगळण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढल्यानंतर आयुक्त सूर्यवंशी यांनी तेथील नगरसेवकांचे महापालिकेतील सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान, १८ वगळण्यात आल्याने या गावांमध्ये महापालिका निधीतून सुरू असलेली अथवा प्रस्तावित असलेली कामे थांबविण्यात येत आहेत. या आदेशाची सर्व विभागप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तर दुुसरीकडे २७ गावांमध्ये प्रामुख्याने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. २७ गावांचा भाग असलेल्या १८ गावांमध्येही पाणीपुरवठा वितरण आणि संकलनाची कामे सुरू आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने निधी दिला असलातरी काही निधीचा हिस्सा हा महापालिकेचा देखील आहे. त्यामुळे या कामांना खोडा बसण्याची शक्यता आहे आणि इतर विकास होणार नसल्याने तेथील पद रद्द केलेले नगरसेवक नाराज आहेत.त्या गावातील पद रद्द केलेले नगरसेवक (माजी नगरसेवक) भाजपचे मोरेश्वर भोईर यांनी आयुक्तांवर खापर फोडत सुपारी घेतली असा आरोप केला.तर याला उत्तर देत आयुक्तांनी सांगितले की शासनाने निर्णय घेतला आहे.माझे काम आहे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे. त्याच निर्णयाचे पालन मी करत आहे.

Related Posts
Translate »