नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – पोलीस भरतीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामट्याला कल्याण मध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भाऊ पोलिस खात्यात भरती होईल या आशेने बहिणीने पोलिसात भावाला भरती करणाचे आमिष दाखविणार्या व्यक्तीला ८० हजार रुपये आणि ५५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल दिला. अनेक दिवस उलटून गेले तरी भाऊ पोलिसात भरती झाला नाही .मात्र तो व्यक्ती या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक झाली आहे. तिने मानपाडा पोलिसांना संपर्क साधला या प्रकरणात सापळा रचत मानपाडा पोलिसांनी अरविंद निकम नावाच्या भामट्याला अटक केली. या भामट्याने राज्यभरातील अनेक तरुणांकडून पोलिस खात्यात भरती करतो असे सांगून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
डोंबिवलीत राहणारी एक महिला अरविंद निकम याच्या ओळखीची होती. डोंबिवलीतील उमेशनगरातील निलकमल बंगल्यासमोर राहणारा अरविंद निकम याने सांगितले की, त्या महिलेच्या भावाला तो पोलिस खात्यात नोकरीला लावतो. महिलेचा विश्वास संपादीत करण्याकरीता अरविंदने पोलिस मित्रमंडळाचे एक ओळखपत्र तसेच आरोग्य खात्याचे एक ओळखपत्र दाखविले. मी पोलिस आणि आरोग्य खात्यात कोणाचीही भरती करुन त्याला कामाला लावू शकतो असा विश्वास त्याने संबंधीत महिलेला पटवून दिला. भाऊ लवकर पोलिस खात्यात भरती होईल या आशेपोटी ८० हजार रुपये अरविंदला दिले. त्यानंतर एक ५५ हजार रुपयांचा महागडा मोबाईलही घेऊन दिला अनेक दिवस उलटून गेले तरी भावाला नोकरी लागली नाही. महिलेच्या लक्षात आले की तिची फसवणूक होत आहे. या संदर्भात महिलेने मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पालीस निरिक्षक विजय कादबााने यांच्याशी संपर्क साधला. विजय कादबाने यांनी पोलिस अधिकारी प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमले. पोलिस कर्मचारी सुनिल पवार , संजीव मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिल्लारे, दिपक गर्गे, सोमनाथ टिकेकर यल्लप्पा पाटील, देवा पवार, नागेश भोईर, शांताराम कसबे, प्रवीण किनरे, अनिल घुगे, चिंतामण कातकळे, अशोक अहेर, विजय आव्हाड, महेंद्र मांजा, नाना चव्हाण, नागेश बडे या पोलिस कर्मचार्यांना अरविंद ला पकडण्याकरीता एका ठिकाणी सापळा रचला. अरविंद त्या महिलेकडून आणखीन एक महागडा मोबाईल मागत होता. महिलेने मी मोबाईल देते असे सांगत त्यासाठी तुम्ही घरडा सर्कलला या असे सांगितले. अखेर हा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या भामटयाने अनेक तरुणांची फसवणू केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करीत आहे पोलिस भरतीकरीता नागरीकांनी कोणाच्या आमिषाला बळू पडू नये. असे कोणी मागणी करीत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.