महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी चर्चेची बातमी

अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – संत्रा उत्पादक बाजार भाव मिळत नसल्याने संकटात सापडला आहे. एकीकडे बांगलादेश मधील निर्यात शुल्क शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावात संत्र्याची विक्री करावी लागत आहे. यातच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरीदरांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे. आंबट गोड चवीसाठी संत्रीची ओळख आहे.

विदर्भातील नागपूर आणि अमरावतीत, संत्राच सर्वाधिक उत्पादन घेतलं जाते. संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने मात्र संत्रा उत्पादक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये विकला जाणाऱ्या संत्राला निर्यात शुल्क जास्त लागत असल्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही. या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो. इतकच नाही तर शेतकऱ्यांना 24 तासाच्या आत संत्र्याचे पैसे दिले जातात.

यासह शेतकऱ्यांनी आणलेला संत्राला डिजिटल मशीन मध्ये टाकण्यात येते. यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो. यावर्षी संत्र्याला 106 रुपये किलो असा भाव मिळाला असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी संत्रा वरूड बाजार समितीत विकण्यास आणतात. भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »