महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

जळगावात ‘वंचित’च्या सभेला मोठा प्रतिसाद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जळगाव/प्रतिनिधी – नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिटलर आहेत. असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर लगावला. ते जळगांव येथे सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते.यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची या वर्षभरात कुठे भेट झालीय का? याचा खुलासा करा. विधानसभा आणि लोकसभा माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षिततेचा प्रश्न सोडवतात. आज त्याला धार्मिक आखाडा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पाकिस्तानने जगासमोर गूढघे टेकले, तुम्हाला त्या पाकिस्तानला गुढघ्यावर आणायला जमतं नाही. तुम्ही कसले राज्यकर्ते? असा प्रश्न देखील त्यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला.

कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर लागलेला अधिकारी, कर्मचारी हा सर्वात असुरक्षित आहे. या असुरक्षित अधिकारी, कर्मचाऱ्याला पक्षाच्यावतीने आश्वासन देतो की, उद्या सत्तेत वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल तर त्याला पर्मनंट केलं जाईल. नव्या गुलामीची मानसिकता सध्या तयार केली जातं आहे. या मानसिक गुलामीला कॉन्ट्रॅक्ट पद्धत खतपाणी घालत आहे. वंचित बहुजन आघाडीला एकदा सत्तेत बसवा ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची गुलामी येथे राहणार नाही. असे आवाहनही ॲड. प्रकाश आंबेडकरांनी जळगाव येथील वंचित बहुजन आघाडी आयोजित सत्ता संपादन निर्धार सभेत केले.

केंद्रशासन हमीभाव जाहीर करते. पण व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात माल विकत घेऊन तो शेतकऱ्याला लुटत आहे. दुसऱ्या बाजुला शहरातील या मालाची खरेदी करणाऱ्या वर्गालादेखील व्यापारी लुटत आहेत. भाजपमधील आमदार, खासदार यांना आव्हान करतो की, मध्यंतरी टोमॅटोचा तुटवडा झाला. कुठल्या दिवशी आणि कोणत्या बंदरात तुम्ही टोमॅटो आणलं ते तरी सांगा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे सरकार व्यापाऱ्यांच सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार नाही. निवडणुकीसाठी फंड पाहिजे म्हणून टोमॅटोचा तुटवडा केला आणि महिन्याभरात या सरकारने १८ हजार कोटी रुपये सामान्य माणसांचे लुटले. असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. सर्वसामान्यांच्या लुटीला हे सरकार पाठीमागे घालत आहे आणि म्हणून या पाठीमागे घालणाऱ्या सरकारला आपण मातीत मिळवलं पाहिजे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »