महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी देश

भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील वाटाघाटींची पुन्हा सुरुवात

नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – भारत आणि श्रीलंका यांच्यात 30 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत श्रीलंकेमध्ये कोलंबो येथे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य करारावरील (ईटीसीए) वाटाघाटीची बारावी फेरी पार पडली. दोन्ही देशांमध्ये 2016 ते 2018 दरम्यान, द्विपक्षीय चर्चेच्या अकरा फेऱ्या झाल्या. त्यानंतर या वाटाघाटी थांबवण्यात आल्या होत्या.

श्रीलंकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व, वाटाघाटी पथकाचे प्रमुख के जे वीरासिंघे यांनी केले, तर भारतीय प्रतिनिधीमंडळाचे  नेतृत्व वाणिज्य विभागाचे सहसचिव आणि वाटाघाटी पथकाचे प्रमुख अनंत स्वरूप, यांनी केले.

या फेरीदरम्यान, दोन्ही बाजूंनी अकराव्या फेरीपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये, वस्तूंचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे, स्वच्छताविषयक आणि फायटोसॅनिटरी उपाययोजना, सेवांचा व्यापार, सीमाशुल्क विभागाच्या प्रक्रिया आणि व्यापार सुविधा, मुलभूत नियम, व्यापार विषयक उपाययोजना, आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य आणि विवादांचा निपटारा, या मुद्द्यांचा समावेश होता. दोन्ही बाजूंनी परस्पर सहयोगाची आणि सृजनशील उपाय शोधण्याची आवश्यकता असलेली क्षेत्रे निश्चित केली.

या फेरीदरम्यान, दोन्ही बाजूंनी अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नऊ समस्यांचे निराकरण झाल्यामुळे, त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. पोशाख आणि मिरचीचा कोटा आणि औषधांची खरेदी यासारख्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली, आणि दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू ठेवण्याचा आणि प्रकरणाच्या निराकरणासाठी नवीन पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला.

प्रस्तावित ईटीसीए दरम्यान, नवीन घडामोडींवर प्रतिसाद देताना शक्य असेल तेव्हा आपल्या पूर्वीच्या मतावर ठाम राहण्याबरोबरच, यापूर्वीच्या प्रगतीवर आधारित उपाययोजना करण्याच्या गरजेवर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. या वाटाघाटींमुळे, दोन्ही देशांसाठी व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या नव्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. भारत-श्रीलंका ईटीसीए, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरेल. या फेरी दरम्यान, भारत आणि श्रीलंका व्यापार भागीदारीमधील प्रचंड क्षमतेला आणि परस्पर हिताच्या क्षेत्रात आर्थिक संबंध वाढवण्याच्या शक्यतांना दोन्ही बाजूंनी दुजोरा दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »