महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

वंचितच्या लढ्यामुळे कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द – सुजात आंबेडकर

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे/प्रतिनिधी – राज्यात शिंदे – भाजप सरकारने घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने करून हा निर्णय रद्द करण्याची आग्रही भूमिका घेतली होती. वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाने राज्यभरात सातत्याने केलेले आंदोलने, पाठपुराव्यामुळे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज कंत्राटी भरतीचा जीआर रद्द झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेत या निर्णयाला प्रखर विरोध दर्शवला होता व सरकारला इशारा दिला होता की, वंचित-बहुजन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कदापि खेळू देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी या निर्णयाविरोधात राज्यभर प्रभावी आंदोलने करत या निर्णयाविरोधात रान उठवले होते. अखेर सरकारला कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घ्यावा लागला.

यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, “आज एक महत्वाचा निर्णय आपल्यासमोर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये क्लास वन ते क्लास फोर ऑफिसर्स आणि बाकीचे शासकीय कर्मचारी यांची जी कंत्राटीपध्दतीने भारती होणार होती, तो निर्णय मागे घेतलेला आहे हा एक आनंदाचा टप्पा महाराष्ट्राच्या राजकारणातला आहे असं मी मानतो.

वंचित बहुजन आघाडीने नांदेड, परभणी,अकोला, सांगली, लातूरसह राज्यभरात आंदोलन केले होते आणि आज त्या आंदोलनाचे यश आपल्या सर्वांना मिळत आहे. आज एका पातळीवरती वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे विद्यार्थी जे या आंदोलनात न घाबरता सहभागी झाले आणि सगळे कोचिंग क्लासेस चालवणारे प्राध्यापक, शिक्षक यांनी न घाबरता भूमिका घेतली आणि आंदोलनाला यश आणण्याचे काम केले. त्या सगळ्यांचे आभार मानतो.

सरकार कोणाचेही असो जर ते इथल्या गोरगरिबांच्या, कष्टकर्यांच्या, शेतकर्यांच्या, तरुणांच्या आणि तमाम वंचित बहुजन समाजातून आलेल्या तरुणांच्या विकासाच्या आणि जीवनाशी जर ते आडवे आले, तर वंचित बहुजन आघाडी त्यांना आडवे करण्याच काम करेल. ज्याप्रकारे आपण कंत्राटीकरनाचे आंदोलन उभे केले, ते मार्गी लावलं आणि सरकारला आपल्यापुढे झुकवून तो जीआर मागे घ्याला लावला. त्याच पध्दतीने आम्ही यापुढे सुद्धा इकडच्या तरुणांच्या समस्यांवरती आवाज उचलू व त्यावर मात करण्यासाठी काम करू, असेही सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »