महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी ताज्या घडामोडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात

नेशन न्यूज मराठी टीम.

कोल्हापूर/प्रतिनिधी – गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, साखर कारखान्याचे वजन काटे डिजिटल व्हावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरातील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पद यात्रेला सुरुवात झाली आहे, जागोजागी फुलांचा वर्षाव करत राजू शेट्टी यांच्या पदयात्रेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले.२२ दिवस या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे .

आजपासून सुरू झालेली पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, 37 साखर कारखान्यांवर ही पदयात्रा धडकणार आहे. स्वाभिमानीच्यावतीने पदयात्रा मार्गावरील साखर कारखाना प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत दुसऱ्या हप्त्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही साखर कारखान्याचे धुराडे देणार नाही असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

जिल्ह्यासह राज्यातील गळीत हंगाम सुरू होण्याला विलंब होत असल्याने आंदोलनाबाबत स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ चर्चा करणार आहेत, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ आर पी शेतकऱ्यांना अदा केली आहे. मात्र दुसरा हप्ता 400 रुपये देण्यासंदर्भात साखर कारखान्यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही या विरोधात आता माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. ही लढाई शेतकऱ्यांना चारशे रुपये मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला.

7 नोव्हेंबरला होणार पद यात्रेची सांगता होणार आहे. आज पासून सुरू झालेली आक्रोश पदयात्रा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना धडक या जयसिंगपूर येथे 7 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत होणार आहे. चारशे रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याबाबत कोणता निर्णय होतो यानंतरच माजी खासदार राजू शेट्टी ऊस परिषदेत पुढील भूमिका मांडणार आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »