महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा पहिला विजय- आ. जयंत पाटील

नेशन न्यूज मराठी टीम.

रायगड / प्रतिनिधी – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक शांततेत पार पडली. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते. गेल्या अनेक वर्षापासून या बँकेवर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे. ही सत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली होती. त्यामुळे 21 जागांपैकी 18 जागांवर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा याआधी फडकला होता. उरलेल्या तीन जागांसाठी मतदान घेण्यात आले.

या निवडणुकीत शेकापचे तीनही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आल्याने बँकेवर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा दिमाखात फडकला. आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आर डी सी सी चे माजी चेअरमन जयंत पाटील यांचे वर्चस्व अबाधित राहिले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा पहिला विजय असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

इतर शेती सहकारी संस्था मतदार संघाच्या एक जागेसाठी आ. जयंत पाटील, महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी प्रिता चौलकर, मधुरा मधुस्टे रिंगणात होते. या तिन्ही उमेदवारांनी या निवडणुकीत बाजी मारल्याने शेकापच्या एकूण 21 उमेदवारांचा दणदणीत विजय झाल्याने शेतकरी कामगार पक्षाने जल्लोष साजरा केला. बँकेमार्फत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आदींसह लहान मोठ्या व्यवसायिकांना उभारी देण्याचे काम जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांनी केले. त्यामुळेच शेकापला विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »